*अहमदनगर येथील आयोजित राज्यस्तरीय चिंतन बैठक-२०१८ च्या निम्मिताने*
--------------------------------------------------------------------------------------
बांधवानो सस्नेह जय श्री प्रभू विश्वकर्मा ! बांधवानो अहमदनगर येथे दि.२३ जून रोजी *राज्यस्तरीय समाज चिंतन बैठक-२०१८* आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने समाजातील विविध विषय, सामाजिक घडामोडी,आव्हाने, प्रलंबित विविध मागण्या शासन स्तरावर नियोजनबद्ध पद्धतीने मांडण्यासाठी व येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट स्तरावर समाज चळवळीस कार्यशील व दिशादर्शक करण्याबाबत सामाजिक संवाद साधण्याच्या यशस्वी प्रयत्न करण्यात येणार आहे.
--------------------------------------------------------------------------------------
बांधवानो सस्नेह जय श्री प्रभू विश्वकर्मा ! बांधवानो अहमदनगर येथे दि.२३ जून रोजी *राज्यस्तरीय समाज चिंतन बैठक-२०१८* आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने समाजातील विविध विषय, सामाजिक घडामोडी,आव्हाने, प्रलंबित विविध मागण्या शासन स्तरावर नियोजनबद्ध पद्धतीने मांडण्यासाठी व येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट स्तरावर समाज चळवळीस कार्यशील व दिशादर्शक करण्याबाबत सामाजिक संवाद साधण्याच्या यशस्वी प्रयत्न करण्यात येणार आहे.
विविध समाजाप्रमाणे आपल्या समाजात हि विविध संघटना व आप आपल्या परीने सामाजिक कार्यकर्ते कार्यरत आहेत. परंतु आप-आपसात समनव्य नसल्याकारणाने राज्यस्तरावर समाजाची एकसंघ शक्ती एकवटू शकली नाही हे आपणास मान्यच करावे लागेल. जो पर्यंत राज्यस्तरावर एकसूत्री व विधायक पद्धतीने एकत्र येणार नाही तो पर्यंत शासन स्तरावर दाद मिळणार नाही.
बांधवानो, व्यक्तिगत स्वरूपात आपण चिंतन करून कौटुंबिक नियोजन करतो, ती व्यक्तिगत जबाबदारी असतेच त्या सोबत आपल्या समाजासमोरील विविध आव्हाने, व परिस्थितीचा आढावा घेऊन सामाजिक चिंतन होणेही तेवढेच महत्वाचे आहे. आणि त्याची सुरुवात हि सामाजिक जाणीव म्हणून स्वतः पासूनच सुरुवात होणे गरजेचे आहे.
बांधवानो, आपल्या समाजात कार्यरत विविध संघटना, संस्था व कार्यशील सामाजिक कार्यकर्ते आहेत हे देखील समाजाचे संचित आहे. याच संचिताना योग्य दिशा दिल्यास राज्यस्तरावर सामाजिक एकता दिसु शकते.त्यासोबतच राजकीय व शासकीय स्तरावर समाजाचे अभ्यासू ,परिपूर्ण नेतृत्वास संधी मिळू शकते.
याच सामाजिक विषयावर अखिल महाराष्ट्र सुतार लोहार संघाच्या पुढाकारातून अहमदनगर येथे राज्यस्तरीय चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे.समाजाचे अभ्यासू व बहुआयामी कार्यशील नेतृत्व *श्री. सुदाम अण्णा खैरनार, मालेगाव* व राज्यस्तरावर समाजकार्यात मनमिळावू, सहज व संवेदनशील सामाजिक नेतृत्व *श्री. प्रदीपजी जानवे साहेब* यांचे मार्गदर्शन व सोबतच शासन स्तरावर सामाजिक विषयाला साक्ष करण्याकरिता राजकीय प्रतिनिधी ची उपस्थिती असणार आहे.
*बांधवानो आपणास आवाहन करतो कि, समाजाची जाण व काळाचे भान राखून कोणताही किंतु-परंतु अथवा संघटनात्मक भेदाभेद मनात न ठेवता " प्रथम प्राधान्य समाज " समोर ठेवून या चिंतन बैठकीस आवश्य उपस्थित राहून सामाजिक संवादात सहभाग नोंदवावा.*
संघटना या समाजाच्या असतात, विविध संघटनामुळे सामाजिक कार्यकर्ते निर्माण होऊन समाजाची एकता शोभित व्हायला पाहिजे, दिशाहीन, ध्येयाविहीन व स्व-महत्वाकांक्षी व बेगडी पद- प्रतिष्ठेपायी अथवा व्यक्तिगत हेवेदाव्यामुळे समाजाचे विघटन होणार नाही याची जबाबदारी आपणासर्वांचीच आहे.
धन्यवाद !
जय श्री प्रभू विश्वकर्मा !
जय श्री प्रभू विश्वकर्मा !
आपल्या सैदव समाज ऋणात,
*श्री बाळासाहेब ना.पांचाळ, नांदेड*
संयोजक, श्री विश्वकर्मा सुतार युवा क्रांती
संपर्क: ९५२७७८००९९
https://www.facebook.com/sutar.yuvakranti.7
http://sutarmahakranti.blogspot.com
*श्री बाळासाहेब ना.पांचाळ, नांदेड*
संयोजक, श्री विश्वकर्मा सुतार युवा क्रांती
संपर्क: ९५२७७८००९९
https://www.facebook.com/sutar.yuvakranti.7
http://sutarmahakranti.blogspot.com